Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे : काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद

Webdunia
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (09:20 IST)
ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आज रात्री १२ ते उद्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
 
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे. 
 
दुसरीकडे धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १४ टक्के कपात केली असताना आता भातसा धरणातील पाणी पुरवठ्यावरही निर्बंध आले आहेत. भातसातून ठाणे शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत असून त्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. तसे पत्र पालिकेला प्राप्त झाले असून ही कपात दररोज न करता आठवड्यातून एक दिवस करावी, अशी मागणी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे केली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments