Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे : काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद

Webdunia
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (09:20 IST)
ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आज रात्री १२ ते उद्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
 
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे. 
 
दुसरीकडे धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १४ टक्के कपात केली असताना आता भातसा धरणातील पाणी पुरवठ्यावरही निर्बंध आले आहेत. भातसातून ठाणे शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत असून त्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. तसे पत्र पालिकेला प्राप्त झाले असून ही कपात दररोज न करता आठवड्यातून एक दिवस करावी, अशी मागणी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

सातारा : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगचा केला अवलंब

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

पुढील लेख
Show comments