Festival Posters

'त्या' लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार

Webdunia
गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (08:29 IST)
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. शिक्षणसंस्थेकडून ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलेल्या आणि चौकशीनंतर घरी परतलेल्या वैशाली वीर-झनकर या फरार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला असल्यामुळे सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्यामुळं एसीबीनं समन्स बजावत त्यांना घरी पाठवलं होतं. सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुपारी अडीच वाजेपर्यंत वैशाली न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्यांना लाचलुचपत विभागानं फरार घोषित केलं आहे.
 
सरकारनं मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांशी संबंधित असलेल्या शाळांमध्ये २० टक्के अनुदानावर नियमित वेतन सुरु करण्याचा कार्यादेश काढण्यासाठी वैशाली झनकर यांनी ९ लाख रुपयांची लाच मागितली होती. शेवटी ८ लाख रुपयांवर तडजोड झाली. या प्रकरणात तक्रारदारानं ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर एसीबीचं पथक नाशिकला रवाना झालं. त्यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला. लाच स्वीकारण्यासाठी एक व्यक्ती पुढे आल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं. तर डॉ. झनकर या क्लास वन अधिकारी असल्यामुळे त्यांच्या घरासह मालमत्तेची झडती रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
 
चौकशीनंतर झनकर या घरी परतल्या. महिला असल्यामुळे सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्यामुळं एसीबीनं समन्स बजावत त्यांना घरी पाठवलं होतं. सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुपारी अडीच वाजेपर्यंत वैशाली न्यायालयात हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन संशयित वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षण कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबरपासून तीव्र आंदोलनाची घोषणा केली

बीएमसीने मुंबईकरांसाठी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत भरती-ओहोटीचा इशारा जारी केला

मोहम्मद शमीने निवडकर्त्यांना त्याच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले, SMAT २०२५ सामन्यात धुमाकूळ घातला

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "सरकारचा कोणताही सहभाग नाही"

पुण्याच्या नवले पूल दुर्घटनेचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केला, नितीन गडकरींनी दिले उत्तर

पुढील लेख
Show comments