Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विजेच्या टॉवरवर चढून गावकऱ्यांचे आंदोलन

Webdunia
सोमवार, 4 जुलै 2022 (17:00 IST)
बुलडाणातील ढालसावंगी गावातील नागरिक गेल्या तीन महिन्यापासून गावात अंधार असल्यामुळे हैराण झाले आहे. या गावाकडे महाराष्ट्र वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. गावात वीज मिळावी यासाठी गावकरांनी वीजवितरण कंपनी कडे तक्रार चे निवेदन दिले असून अद्याप या गावाकडे वीजवितरण कंपनीचे काही लक्ष नाही. ग्रामस्थानानी कंटाळून आणि चिडून तीव्र आंदोलनाची भूमिका घेत थेट विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. 

ढालसावंगी गावातील विजेचे तीन फिडर असून ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहे. ते बदलून देण्याची मागणी गावकरांनी केली होती. ते बदलले गेले नसल्यामुळे गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. गावात अंधार असल्यामुळे गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वीजमंडळ कार्यालयाच्या फेऱ्या करून देखील गावात अद्याप वीज आलेली नाही. या वर कठोर भूमिका घेत गावातील नागरिकांनी विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं आणि फिडर बदलून गावात वीज आली नाही तर मोठं आंदोलनाचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.   

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments