Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच जाणवणार

cold
Webdunia
बुधवार, 31 जानेवारी 2024 (09:43 IST)
सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच १ फेब्रुवारी पर्यंत जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से. ग्रेड म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने, तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली व छ. सं. नगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक तर दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असू शकते, असा अंदाज आहे. विदर्भात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असू शकते, असे वाटते.
 
उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल. नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दीड डिग्रीने अधिक राहून म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल, असेही खुळे यांनी सांगितले.
 
पुण्यात थंडी कायम !
 
सध्या पुणे शहरामध्ये १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. शिवाजीनगरला १३.६ अंश सेल्सिअस तापमान असून, वडगावशेरीला मात्र १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात हा गारठा आणखी दिवस असा राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments