Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्याने कोथिंबीर वाटली फुकट

Webdunia
गुरूवार, 9 मार्च 2023 (08:09 IST)
मनमाड : वातावरणातील सततचे बदल, निसर्गाचा लहरीपणा या सगळ्याशी दोन हात करत रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला पिकवतो. मनमाड येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात कोथिंबीरीचे पीक घेतले होते, मात्र कोथंबिरीला कवडीमोल मिळत असल्याने मेटाकुटीला आलेल्या दिलीप सांगळे या शेतकऱ्याने अक्षरशः कोथिंबीरी फुकट वाटली आहे.
 
शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात असताना मनमाडमध्ये दिलीप सांगळे या शेतकऱ्याने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कोथिंबीरला व्यापारी घ्यायला तयार नसल्याने, त्यांनी नाराज होऊन रस्त्यावर ओरडून ओरडून कोथिंबीर चक्क फुकट वाटली.
 
कोथिंबीर पिकासाठी त्यांना १५ हजार रुपये खर्च आला. मात्र, पदरात काहीच पडत नसल्याने अखेर त्यांना कोथिंबीर बाजारात फुकट वाटण्याची वेळ आली. अस्मानी-सुलतानी संकटात अडकलेला शेतकरी आता पुरता हवालदिल झाला असून, अगदी पदरमोड करून व प्रसंगी कर्ज घेऊन उभे केलेल्या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
 
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली कोथिंबीर विक्री होत नसल्याने श्री. सांगळे हैराण झाले.
 
कोथंबिरीला व्यापारी भाव लावत नसल्याने तिची विक्री होत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या सांगळे यांनी बाजार समितीत कोथिंबीर विकण्यापेक्षा ती नागरिकांना फुकट वाटल्यास आशीर्वाद तरी मिळेल, या भावनेने भाजी बाजारात रस्त्यावर उभे राहून ओरडुन ओरडुन ही कोथिंबीर नागरिकांना फुकट वाटली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments