Dharma Sangrah

ओबीसी जनगणना करण्याची सरकारला भीती वाटते

Webdunia
मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (20:57 IST)
नाशिक : देशभरात ओबीसी घटकांची संख्या पन्नास टक्के पेक्षा अधिक असल्यामुळे केंद्र सरकार ओबीसी जनगणना करण्यास घाबरत आहे.कारण जनगणना झाल्यानंतर ओबीसींची वाढीव आरक्षण द्यावा लागेल अशी भीती वाटत असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री कॅप्टन अजयसिंग यादव यांनी केले.
 
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या मंथन शिबिराच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर होते.दोन दिवस नाशिक येथे मुक्कामी होते.त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला.त्यावेळी सरचिटणीस राहुल यादव,महाराष्ट्र प्रभारी शितल चौधरी,उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत,प्रदेश उपाध्यक्ष मिलिंदचित्ते, शहराध्यक्ष गौरव सोनार,जिल्हाध्यक्ष अरुण नंदन ,अशोक खलाणे,यशवंत खैरनार,मयूर वांद्रे यांच्यसह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.      
 
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे योगदान देशभरातील लोकांना माहिती आहे.आठ वर्षात केंद्र सरकार ईडी आणि सीबीआय दबाब टाकून लोकशाही संपवायला निघाली आहे.ज्या लोकांनी भ्रष्ट्राचार केला ते डरपोक लोक भाजपच्या अमिषाला बळी कॉंग्रेस सोडून जात आहे.
 
आज देशांत जाती धर्मामध्ये तेढ पसरवून लोकांना आपापसांत लढण्यासाठी भाग पाडत असल्याने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशवासियांना जोडण्याचे काम करत असून लोकांचा चांगला प्रतिसाद या यात्रेला मिळत आहे.यात्रेच्या माध्यमातून देभारातील छोट्या पासून मोठ्या पर्यंत सर्व लोकांना भेटून चर्चा करत आहे.

आगामी काळात देशभरातील जास्तीत जास्त ओबीसी घटकांना लोकसभा ,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये उमेद्वारी देण्यावर भर दिला जाणार असल्यामुळे देशभरात ओबीसी संघटन मजबूत करून कॉंग्रेस पक्षाच्या मागे उभे राहण्यासाठी देश पिंजून काढणार असल्याचा निर्धार यादव यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मतदार यादीत मोठा घोटाळा उघडकीस

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

अरे देवा! एकाच वडिलांची २६८ मुले? पनवेल मतदार यादीत मोठा घोटाळा; निवडणूक पारदर्शकतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित

अजब गावाची गजब परंपरा, वर सजला वधू प्रमाणे तर वधूने घातला वराचा पोशाख; यामागील रहस्य काय आहे?

IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा या दिवशी होऊ शकते

पुढील लेख
Show comments