Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढील 100 दिवस महत्त्वाचे आहेत :अजित पवार

Webdunia
बुधवार, 21 जुलै 2021 (15:39 IST)
राज्यातील सर्वांनीच कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली, तीही नियमांचं पालन करुनच केली आहे.कमीत कमी लोकांमध्ये कार्यक्रम पार पाडले पाहिजेत.लग्न किंवा इतर कार्यक्रमालाही किती लोकं असली पाहिजे,हे नियम ठरवले आहेत. या नियमाबाहेर असेल, तर ते मंत्री असू द्या किंवा सर्वसामान्य, सर्वांना नियम सारखेच,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.तसेच, पुढील 100 दिवस महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
 
ज्या नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरही वेगळं मत मांडत आहेत. काही मान्यवर असं मत माडतात की, इथून पुढे 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत.त्या,120 दिवसांत आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.लोकांनी नियमांचं तंतोतंत पालन करायला हवं. मात्र, ग्रामीण भागात हे नियम पाळले जात नाहीत, मी नगर जिल्ह्यातील एका गावात गेलो होतो, तेथे मला नेहमीप्रमाणे वातावरण दिसलं, कुणीही मास्क घातला नव्हता, हा निष्काळजीपणा आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं.     
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

सांगलीतील या गावात लोकांची ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरने निवडणुका करण्याची मागणी

नागपुरात वॉशरूमच्या खिडकीतून महिलांचा व्हिडिओ बनवणाऱ्या शिक्षकाला रंगेहाथ पकडले

LIVE: संजय राऊत काँग्रेसमध्ये जाणार !

नागपुरात टीशर्टच्या पैशांच्या वादातून मित्राचा गळा चिरून निर्घृण खून

ठाण्यात शाळेजवळ झाडाला गळफास लावून विद्यार्थ्यांची आत्महत्या

पुढील लेख
Show comments