Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विकृत मुलाने वडिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले

Webdunia
सोमवार, 27 एप्रिल 2020 (16:18 IST)
नागपूरमध्ये एका मुलाने वृद्ध वडिलांची निर्घृण हत्या केली. भीषण बाब म्हणजे वडिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करताना हा विकृत मुलगा बॉलिवुड सिनेमांची गाणी म्हणत होता. हा निर्घृण प्रकार करत असताना त्याला अडवणाऱ्या आई आणि बहिणीला देखील जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. अखेर पोलिसांनी त्याला त्याच्याच घरातून अटक केली असून त्याच्यावर वडिलांची हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
नागपूरच्या हुडकेश्वर भागामध्ये आरोपी विक्रांत पिल्लेवारत्याच्या कुटुंबासोबत राहातो. मात्र, त्याला कोणत्याही कारणाशिवायच प्रचंड संताप येत असे. अशाच संतापात त्याने वडिलांच्या गळ्याला जोरदार चावा घेतला. यामुळे त्यांच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मग विक्रांतने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना फरफटत व्हरांड्यात आणलं. यामध्ये त्याची आई आणि त्याच्या बहिणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चाकू दाखवून त्या दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
 
दरम्यान, वडिलांना व्हरांड्यात आणल्यानंतर विक्रांतने त्यांचं गुप्तांग कापून टाकलं. अजूनही तो प्रचंड संतापात होता. या प्रकारात त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. पण विक्रांतचा राग शांत झाला नव्हता. त्याने व्हरांड्यातच हातातल्या चाकूने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली. धक्कादायक प्रकार म्हणजे हे सगळं करत असताना विक्रांत बॉलिवुडमधल्या सिनेमांची गाणी म्हणत होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

पुढील लेख