Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महसूलमंत्र्यांचा तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र

Webdunia
बुधवार, 5 मे 2021 (15:58 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील महसूलमंत्र्यांचा तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई भासू लागली आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरुन खाली यावे लागत आहे.दरवर्षीच उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. मात्र, तेव्हा टँकर सुरू केले जातात. यावर्षी प्रशासकीय यंत्रणा करोनासंबंधीच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे.
 
त्यामुळे टँकरसंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही. मे महिना सुरू झाल्यानंतर दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढली आणि पठारभागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.येथील महिला, पुरुष, लहान मुले हंडे घेऊन पाणी आण्यासाठी डोंगर उतरुन खाली येतात. पुन्हा विहिरीतून पाणी शेंदून हंडा भरायचा आणि डोक्यावर दोन ते तीन हंडे घेवून डोंगर चढायचा, असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे.
 
वर्षांनुवर्षांपासून अशा पद्धतीने आदिवासी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भर उन्हात महिला पाणी वाहून नेत असल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments