Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संभाजीराजे छत्रपतींवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - दिलीप वळसे पाटील

Webdunia
सोमवार, 31 मे 2021 (23:08 IST)
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही, असं ट्वीट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं.
 
त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय, "छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता."
संभाजीराजे यांनीही यानंतर हा विषय संपला असल्याचं म्हटलं आहे.
 
त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "आताच गृहमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. पण त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसं केलं असावं."
 
"मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून. हा विषय संपला आहे," असंही ते म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर दौरा करत आहेत.
 
यादरम्यान त्यांनी आज (31 मे) ट्वीट करत म्हटलं, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
 
"माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?", असाही सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.
आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर आपलं समाधान झाल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments