Marathi Biodata Maker

पावसाचा जोर सुरूच!

Webdunia
शनिवार, 15 जून 2024 (14:15 IST)
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यामुळे पावसाचा जोर सुरूच आहे. तसेच राज्यातील अहमदनगरमध्ये देखील पावसाने जोर धरला आहे. तसेच पावसाने दक्षिणेत हजेरी लावली आहे. तर पाथर्डी तालुका व नगरमध्ये पाऊस झाला आहे. 
 
परिसरातील शेतांमध्ये पावसाने पाणी साचल्यामुळे शेतांचे तळे झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक खारोळी नदीवरील बहुतांशी बंधाऱ्यांनी झाली आहे. पेरण्या मात्र सतत होणाऱ्या पावसामुळे  लांबल्या आहे. 
 
मृग नक्षत्रात पावसाने नगर तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. सीना तसेच शेंडी पोखडर्डी येथील नद्यांना महापूर आला होता कारण  
उदरमल, शेंडी, पोखर्डी, जेऊर पट्टयात ससेवाडी, येथे जोरदार पाऊस झाला. आता पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे मात्र सतत पडत असलेली पावसाची धार मात्र शेतरकऱ्याची पेरणी लांबणीवर टाकत आहे. तसेच म्हस्के वस्ती, कोथिंबीरे मळा, माळखास, जेऊर चापेवाडी येथे देखील जोरदार पाऊस झाला. 
 
तसेच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक खारोळी नदीवरील बंधाऱ्यांनी केली आहे. तर शेतकरी वर्गामध्ये समाधान पसरले आहे कारण जेऊर मध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात कमीतकमी ३५ वर्षानंतर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments