Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढील 4 दिवस सूर्य तापणार ; राज्यात ऑरेंज अलर्टचा इशारा

Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (11:15 IST)
सूर्य विदर्भात मागील काही दिवसांपासून जास्त तापत आहे. नागपूर, अकोला, वर्धा, चंद्रपुरात तापमान 45  अंशापेक्षा जास्त आहे. राज्यात काही भागात अवकाळी पाऊस पडला. तर राज्यातील विदर्भ  आणि  मराठवाड्यात उकाडा जास्त जाणवत आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. विदर्भात 2 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहे. 

या काळात उष्माघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असल्यास बाहेर पडावे अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. पुढील चार दिवस संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
सध्या राज्यात तापमान 45 अंशाच्या पुढे गेला आहे. काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचे सांगण्यात आले आहे. शनिवार पासून 2  मे पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.  
 
राज्यात येत्या 4 दिवसांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपुरात पारा तब्बल 46.4 अंशांवर पोहचलाय. त्यामुळे पुढचे चार दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत.
 
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली असून इथे पारा 46.4 अशा पर्यन्त पोहोचला आहे. जळगावात 45.9 अंश एल्सिअस अकोला 45.4 अंश ,यवतमाळ 45.2, वर्धा 45.1 नागपूर 45.2 तर अमरावतीत 45 अंश तापमानाची नोंद झाली .
 
 
 

संबंधित माहिती

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

पुढील लेख
Show comments