Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेततळ्यात पडून मायलेकींचा दुर्देवी अंत

Webdunia
बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (15:51 IST)
शेततळ्यात पाय घसरून पडून मायलेकींचा दुर्देवी अंत झाल्याची घटना काल रात्री बारामती तालुक्यातील अंजनगावी घडली आहे.या पाण्यात तिघी जणी पडल्या होत्या त्यापैकी एक मुलगी सुदैवाने वाचली आहे.
 
अश्विनी सुरेश लावंड वय वर्ष (36),समृद्धी सुरेश लावंड वय वर्ष (15),या दोघी मृत्युमुखी झालेल्याची नावे आहेत तर श्रावणी सुरेश लावंड वय वर्ष 12 ही सुखरूप असे.

घटनेच्या दिवशी अश्विनी आपल्या दोन्ही लेकींना घेऊन शेतात गेल्या. तहान लागल्यावर शेतातील शेततळ्यात पाणी घेण्यासाठी बाटली घेऊन गेली असताना समृद्धीचा पाय घसरून ती शेततळ्यात पडली. लेकीला वाचविण्यासाठी आईने प्रयत्न केला पण तिचा पाय घसरून त्या दोघी पाण्यात पडल्या. त्यांना पडलेले बघून लहानग्या श्रावणीने देखील पाण्यात उडी घेतली.त्या तिघी बुडू लागल्या.

सुदैवाने श्रावणीच्या हाती प्लास्टिकचे कागद लागले त्याला धरून ती पाण्यातून बाहेर आली.नंतर तिने आई आणि बहिणीला वाचविण्यासाठी आरडाओरड केली.तिचे ओरडणे ऐकून स्थानिक लोक तातडीने तिच्या आवाजाच्या दिशेने आले.ते येण्यापूर्वीच आई आणि लेकीचा पाण्यात बुडून अंत झाला होता.स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढले या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलीस तपास करत आहे.
 

संबंधित माहिती

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

पुढील लेख
Show comments