Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माध्यमात माझ्या राजीनाम्याबद्दल चालवल्या जात असणार्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही : अनिल देशमुख

There is no fact
Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (14:43 IST)
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सध्या महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. गृह विभाग सांभाळणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कामगिरी तर अतिशय सामान्य राहिल्याचे दिसून येत आहे.
 
मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकांसह आढळलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे एपीआय सचिन वाझे यांना अटक झाली. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडीनंतर आता थेट गृहमंत्र्यांच्या गच्छंती होणार असल्याची चर्चा आहे.
 
नवी दिल्लीमध्ये काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात जवळपास २ तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली.तसेच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याचे समजते.
 
दरम्यान, अनिल देशमुख यांनी दिल्लीत पवारांची भेट घेतल्यावरून इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी देशमुख राजीनामा देणार असल्याचे वृत्त प्रसारित केले होते.यावर देशमुख म्हणाले की, माध्यमात माझ्या राजीनाम्याच्या बातम्या चालवल्या जात त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे जाहीर केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकार नागपुरात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करणार

LIVE: सरकारने नागपुरात SIDM स्थापन करण्याचा निर्णय घेतला

माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भाजप मध्ये प्रवेश

पनवेल मध्ये स्कूटरवरून पडून ट्रकखाली आल्याने महिलेचा चिरडून मृत्यू

मनसेची मान्यता रद्द होणार! राज ठाकरेंविरुद्ध उत्तर भारतीय विकास सेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

पुढील लेख
Show comments