Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात खळबळ उडाली! मोबाईल द्वारे EVM हॅक केल्याचा दावा

Webdunia
सोमवार, 17 जून 2024 (08:23 IST)
शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघातून उभे असून केवळ 48 मतांनी ते जिंकले.या वरून बराच वाद झाला.निवडणुकीच्या दिवशी गोरेगाव निवडणूक केंद्रावर मोबाईल बंदी असताना मोबाईलचा वापर केल्या प्रकरणी रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर यांच्यासह निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे अधिकारी गौरव यांच्याकडे एक मोबाईल फोन होता ज्याद्वारे मतमोजणी दरम्यान एक ओटीपी तयार होतो आणि हा मोबाईल वाईकरांचे नातेवाईक पंडिलकर वापरत होते. पहाटेपासून दुपारी 4 वाजे पर्यंत मोबाईलचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. 
 
निवडणूक आयोगाकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून, ते आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. 

या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथके तयार केली असून पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.पोलिस फोनचा सीडीआर घेऊन मोबाईल क्रमांकाची सर्व माहिती गोळा करत आहेत. सध्या पोलीस त्याचा तपास करत असून आता मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे.  
 
या घटनेबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. काँग्रेसने ट्विटरवर लिहिले की, 'ईव्हीएमशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. मुंबईत एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आला होता. अशा स्थितीत एनडीएच्या उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला?  शंका निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे. 
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत नामदेव महाराज

मुंबईचा गोखले ब्रिज झाला तयार, BMC सुधारली चूक ज्यावर उठला होता विनोद

Sensex : शेअर बाजारात सेन्सेक्सने पहिल्यांदा 80 हजारांचा टप्पा पार केला, निफ्टी 24300 च्या जवळ

महाराष्ट्र : प्रत्येक महिन्याला शेतकरी करीत आहे आत्महत्या, या वर्षी 1046 शेतकऱ्यांनी दिले आपले प्राण

लोन देण्याच्या नावावर फसवणूक, 2 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

सर्व पहा

नवीन

इंदापूरजवळ कारचे टायर फुटून अपघातात 5 जण ठार

महाराष्ट्रामध्ये 'लाडकी बहीण योजना' लाभार्थी महिलांचे वाढवले वय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची मुदतवाढ 31 ऑगस्ट पर्यंत -अजित पवार

मांढरदेवी ते हाथरस : धार्मिक कार्यक्रमातल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा आहे हृदयद्रावक इतिहास

हाथरस चेंगराचेंगरी : 'सत्संगानंतर लोक भोले बाबांच्या पायाची धूळ घ्यायला गेले आणि गोंधळ उडाला'

पुढील लेख
Show comments