Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ते महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास गायब झाले आहेत

Webdunia
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (08:37 IST)
शिवसेना नाव आणि पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गट आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. यातच आता मिस्टर इंडिया चित्रपटातील डायलॉग वापरुन भाजपने "मिस्टर इंडिया गायब झाला" म्हटले आहे.
 
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खलनायक वर्णन करत ‘मोगॅम्बो खुश झाला’ असे म्हटले होते. त्यावर आता भाजपने उद्धव यांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव यांच्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, ते स्वतः मिस्टर इंडिया बनत आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास गायब झाले आहेत. उद्धव ठाकरे भाजप नेतृत्वाला मोगॅम्बो म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना गोष्टी समजत नाहीत, तेच असे मूर्खासारखे भाष्य करतात, अशी टीका त्यांनी केली. 
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments