Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या नागापूरचा असा आहे निवडणूक निकाल

Webdunia
मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (15:54 IST)
मनमाड पासून जवळच असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीची निवडणूकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र पवार हे थेट सरपंचपदी ९०३ मते घेऊन विजयी झाले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार  तर रघुनाथ सोमासे  यांचा पराभव झाला. इंधन कंपन्यांच्या मालमत्ता करापोटी वार्षिक कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न या ग्रामपंचायतीला मिळते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मोजक्या श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक नागापूर ही ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथील निवडणूक राज्यभर चर्चेत होती. या ग्रामपंचायतीचा निकाल अखेर लागला आहे.
 
विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार हे स्वतः सरपंचपदाच्या निवडणुकीत होते. तर त्यांच्या पॅनल विरोधात त्यांचेच बंधू माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल उभे होते. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेची ठरली. रविवारी या नागापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सर्व सदस्यांसाठी रविवारी मतदान झाले. या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी तिरंगी लढत झाली. दोन्ही पवार बंधूंव्यतिरीक्त तिसरे पॅनलही येथे होते. त्यामुळे येथे कोणाच्या हाती सत्ता जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
 
नांदगाव तालुक्यात थेट सरपंचपदी निवड झालेले उमेदवार असे
– बोयेगाव – बबन पोपट शेरमाळे
– लोढरे -ज्योती प्रमोद निकम .(शिंदे गट)
– हिरेनगर – मंगला श्रावण बिन्नर (शिंदे गट)
– धोटाने खुर्द – शरद अशोक काळे
– लक्ष्मीनगर – मीराबाई शंकर उगले
– भार्डी – अनिता अशोक मार्कंड
– हिसवळ – शांताराम पवार
– मुळडोंगरी – जन्याबाई पवार
– धनेर – मनीषा वाघ
-पिंपखेड – जीवन गरुड
– तळवाडे – शीतल निकम
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments