Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही लोकांनी जो हट्ट केला, त्याचा हा परिणाम : मुनगंटीवार

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (10:13 IST)
काही पक्षातील नेत्यांच्या हट्टामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, असे म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. मुंबई येथे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 
 
मुनगंटीवार पुढे म्हनाले की. योग्य वेळ आली की, भाजप आपली भूमिका जाहीर करणार आहे. भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. राज्यपालांनी आम्हालाही सत्ता स्थापनेसाठी २४ तासांचाच कालावधी दिला. सर्वात मोठा पक्ष भाजप असताना आणि मतदारांनी तसा जनादेश दिलेला असताना मित्र पक्षाने जनादेशाचा अनादर केला. इतर पर्याय असल्याचं सांगून मित्रपक्षाने राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती ओढवली. काही लोकांनी जो हट्ट केला, त्याचा हा परिणाम आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments