Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्यामुळे काही लोकांना मळमळ होतेय, देवेंद्र फडणवीस यांनी केले भाष्य

त्यामुळे काही लोकांना मळमळ होतेय, देवेंद्र फडणवीस यांनी केले भाष्य
, गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (18:16 IST)
संविधानाप्रमाणे हे सगळे अधिकार राज्यपालांचे आहेत. राज्यपाल हे प्रमुख आहेत आणि संविधानाने त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला सल्ला देण्यासाठी त्याठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे राज्यपालांना दौरे करु नका असं कोणी सांगू शकत नाही.

पीसी अलेक्झांडर किंवा राज्यपाल जमीर यांनी तर महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्याचा दौरा केला आहे. मग त्यावेळी हे विषय का आले नाहीत. हे राज्यपाल प्रामाणिकपणे आपलं काम करतायतं त्यामुळे काही लोकांना मळमळ होतेय. ती मळमळ याप्रकारे बाहेर निघतीय त्या लोकांना माझा सल्ला आहे. त्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करावं आणि त्यानंतर अशी वक्तव्य करावी,” असे राज्याचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Online Driving License ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळवायचे