Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याने दिला सर्वाधिक ऊसदर !

अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याने दिला सर्वाधिक ऊसदर !
, मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (08:24 IST)
राज्यातील साखर कारखानदारी अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आहे. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन वाढले पण बाजारात साखरेस मागणी नाही.अगस्ती साखर कारखान्याने प्रतिटन ५०० ते ६०० रुपये आर्थिक नुकसान सहन करून एफआरपीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर दिले.
 
जिल्हा सहकारी बँकेने वेळोवेळी सहकार्य केल्यानेच अगस्तीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक ऊसदर दिले आहेत. सर्वांच्याच योगदानामुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले.अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा २८ वा गळीत हंगामाचा बॅायलर अग्निप्रदिपन समारंभ रविवारी पार पडला. यावेळी गायकर बोलत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप