Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अस होणार चिपी विमानतळाचं उद्घाटन

Webdunia
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (21:45 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ९ ऑक्टोबर २०२१ रोजी चिपी  विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते केलं जाणार आहे अशी माहिती दिली आहे. त्या दिवसापासून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. सात वर्षे विमानतळ बांधून तयार होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच त्या दिवशीचा कार्यक्रमही जाहीर केला. “९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजचा चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. मी आणि ज्योतिरादित्य सिंधिया विमानाने मुंबईला येऊ आणि तिथून सिंधुदुर्गला जाणार आहोत. मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.
 
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवणार का?, असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता ‘मुख्यमंत्री पाहीजेत असं नाही’, असं उत्तर त्यांनी दिलं. “क्रेडीट घेण्याचं प्रश्नच नाही. मी २०१४ सालापर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केलं. मी स्थानिक नाही का? आम्ही स्थानिक असल्याने आणि विमानतळ बांधल्याने आमचा अधिकार आहे. पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला. कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते हे माहिती नाही. मी संबंधित मंत्र्यांशी याबाबत बोललो आहे.”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. दुसरीकडे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वी चिपी विमानतळावरून विमानाचं उड्डाण ७ ऑक्टोबरपासून होणार आहे, अशी घोषणा केली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात GBSची रुग्णसंख्या 130 वर

पुण्यात GBSची रुग्णसंख्या 130 वर,20 रुग्ण व्हेंटिलेटरवर

बीडमध्ये यापुढे राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही अजित पवारांचा इशारा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक, बनावट पासपोर्ट जप्त केले

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांमधील वाद संपणार! आले मोठे अपडेट

पुढील लेख
Show comments