Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२० दिवसांनंतर राज्यातील पहिला टोलनाका टोलमुक्त होणार

toll naka thane
Webdunia
शनिवार, 22 एप्रिल 2017 (11:21 IST)
राज्यातील पहिला टो नाका भिवंडी बायपासवरील खारेगाव नाक्यावर आहे. या टोलचे कंत्राट संपले असून २० दिवसानंतर हा नाका टोलमुक्त होणार आहे. १५ वर्षांच्या कार्यकाळात या टोलनाक्याने सुमारे ४९० ते ५१० कोटी रूपयांची वसुली केली आहे.  हा रस्ता उभारणी आणि १५ वर्षांतील देखभाल दुरूस्तीचा खर्च १८० कोटी ८३ लाख रूपये होता.
 
सर्वाधिक टोलनाक्यांचा जिल्हा अशी ठाण्याची ओळख असून या जिल्ह्यात जवळपास १८ टोलनाके आहेत. त्यातला पहिला टोल नाका हा मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या भिवंडी बायपास रोडवरील खारेगाव येथे उभारण्यात आला होता. केवळ ठाणे जिल्ह्यातलाच नव्हे तर राज्यातला हा पहिला टोल नाका होता. आयआरबी या कंपनीने या रस्त्याची बांधणी केली होती. त्या मोबदल्यात त्यांना रस्त्यावर टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती. वास्तविक १९९८ सालापासूनच या रस्त्यावर टोलवसुलीला सुरूवात झाली होती. मात्र, अधिकृत अधिसूचना २००२ साली काढण्यात आली होती.
 
या रस्त्याची बांधणी आणि देखभाल दुरूस्तीच्या खर्चाची आर्थिक सांगड घालून १५ वर्षांसाठी आयआरबी कंपनीला या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांकडून टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती. रस्ता बांधकामाचा खर्च आणि १५ वर्षातील देखभाल दुरूस्तीवर कंपनीने सुमारे १८० कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र, व्याज आणि अन्य विविध कारणांपोटी वाढीव टोलवसुलीची परवानगी टोलच्या करारामध्ये देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे ४९० ते ५१० कोटींपर्यंत वसुली गेल्याचे कंपनीच्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सोलापूर : सांगोला तालुक्यात गर्भवती महिलेने केली आत्महत्या

Rani Durgavati Information गोंडवानाची वीरांगना राणी दुर्गावती

UPSC 2024 Result: UPSC CSE अंतिम निकाल जाहीर, प्रयागराजचे शक्ती दुबे देशात अव्वल

लातूर : न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्याला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली

मुंबई : विक्रोळी पूर्व भागात महिलेची गळा चिरून हत्या

पुढील लेख
Show comments