Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन बहिणींनी रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले

Webdunia
शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (18:03 IST)
दोन आयटीआयच शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींनी धावत्या रेल्वेतून उडी मारून आपलं आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मनारखेड रेल्वे चौकी परिसरात या दोघी मुलींनी मुंबई- कलकत्ता रेल्वेतुन एकापाठोपाठ उडी मारली. 
 
कुमारी बेबी राजपूत वय वर्षे 19 राहणार चापा जिल्हा जांगीर छत्तीसगड आणि कुमारी पूजा गिरी वय वर्ष 19 राहणार चापा जिल्हा जांगीर, छत्तीसगड असे या मयत मुलींची नावे आहेत. या दोघी सक्ख्या मावस बहिणी आहे. या मुलींनी काही दिवसांपूर्वी कोपाची ऑनलाईन परीक्षा दिली असून त्यांचे आयटीआय मध्ये कोपाचं प्रशिक्षण सुरु होते.
 
या दोघी मुलींच्या अंगावर आयटीआयचा युनिफाँर्म असून चार दिवसांपूर्वी आम्ही आयटीआयला जातो असं सांगून घरातून बाहेर पडल्या आणि परत आल्या नाही. त्यांचा शोधाशोध घेतल्यावर ही त्या सापडल्या नाही म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली. दरम्यान त्यांनी रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले.  
 
या दोघी बहिणी छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून त्यांनी रागाच्या भरात येऊन घर सोडले आणि नंतर रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले. दोन मुलींचे मृतदेह रेल्वेच्या रुळावर आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळतातच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळतातच दोन्ही कुटुंब दुःखात बुडाले आहे. त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर उद्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 
पोलिसांना प्रवाशांनी दिलेल्या  माहितीनुसार, या दोघीनी एका पाठोपाठ रेल्वेतून उडी मारली. आत्महत्येचे कारण अद्याप माहित नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
  

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments