Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन वर्षांची फसवणूक, राज्याला कर्जबाजारी केले', संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Webdunia
रविवार, 30 जून 2024 (13:52 IST)
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. या वर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आज महाराष्ट्रात चोर आणि बदमाश सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. हे मला वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून समजले. ही दोन वर्षे फसवणुकीची आहे. 
फसवेगिरीने हे सरकार आले आहे. राज्याला कर्जबाजारी बनवले आहे. या सरकारने महाराष्ट्रातील उद्योगांना गुजरात मध्ये जाऊ दिले आहे. हे राज्याचे दुर्देव  आहे. 
 
यासोबतच संजय राऊत म्हणाले, 'विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती निर्णय देऊन या सरकारला वाचवले आहे. राज्यपालांनी असंवैधानिक बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. या सर्वांनी हे सरकार बनवून बेकायदेशीर आणि असंवैधानिक काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने या सरकारला नाकारले आहे. विधानसभा निवडणुकीतही या सरकारचा पराभव होईल. 
 
या सरकारने स्वतःचा पक्ष काढायला हवा होता. स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवायला हवी होती. हा अर्थसंकल्प जनतेची फसवणूक करून त्यांच्या पैशाने मते विकत घेण्याचा प्रयत्न आहे. या विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या पैशाने मते विकत घेण्याचा थेट प्रयत्न म्हणजे लाचखोरी आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments