Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत : नितेश राणे

Webdunia
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (15:43 IST)
भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर खोचक टीका केली आहे.उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत,असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यात त्यांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओत नितेश राणे यांनी म्हटलं आहे 'आमच्या कोकणाचे शक्ती कपूर आणि कोकणातील सचिन वाझे यांचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारं वैदयकीय महाविद्यालय, या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. पण या महाविद्यालला परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली,तसंच चीपी विमानतळासाठी विमानसेवा सुरु करण्याची परवानगीही नारायण राणे यांच्यामुळेच मिळाली असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
 
उदय सामंत कदाचित विसरले असतील महाविद्यालय आणि चिपी विमानतळासाठीच्या परवानग्या, मिळवण्यासाठी केंद्र सरकारमध्ये ताकद लागते, वलय लागतं, राणेसाहेब केंद्रीय मंत्री झाल्यानंतर चिपी विमानतळाला परवानगी कशी मिळाली, 2014 ते 2019 मध्ये शिवसेना पक्षाचे अरविंद सावंत हे कोकणाचे भूमिपूत्र आहेत,ते ही केंद्रात मंत्री होते, तेव्हा का परवानगी मिळाली नाही. तेव्हा तर शिवसेना भाजपमध्ये युतीत होतात, पण नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर परवानग्या कशा मिळतात असा सवाल करत घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा हे प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार करावा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments