Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव यांचे मन एवढे मोठे नाही, राणे यांचा टोला

Webdunia
गुरूवार, 8 जुलै 2021 (15:29 IST)
राज्यातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. यावर शिवसेनेकडून  राणे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.  राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांचा मला फोन आला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्यात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना फोन आला नाही, हे सांगताना उद्धव यांचे मन एवढे मोठे नाही, असा राणे यांनी टोला लगावला.
 
राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या खोचक टीकेलाही नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का, असे विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, नाही. त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचे मन इतके मोठे नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो, असा खोचक टोला लगावला. दरम्यान शरद पवार यांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. त्यांनी चांगले काम कर, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments