Marathi Biodata Maker

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

Webdunia
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (15:38 IST)
महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी अखेर पार पडली. या बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास झाले आहे. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केले आहे. 
 
बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले असून आता राज्यात उद्धव सरकार स्थापन झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.
 
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. मात्र १७० पेक्षा अधिक आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करतील असा दावा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला होता. मंत्रिपदाची शपथ ही सभागृहातील घटना नाही, याचा अधिकार राज्यपालांना, मंत्रिमंडळाला हंगामी अध्यक्ष बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो. राज्यपालांनी केलेली निवड यामुळे सभागृह चालविण्याचा अधिकार मला प्राप्त झाला आहे  असे मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर सगळे नियम, कामकाज धाब्यावर बसवून सभागृहाचं कामकाज सुरु आहे, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह सुरु आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
देशाच्या इतिहासात कधीही हंगामी अध्यक्ष अधिवेशन सुरु असताना बदलला नाही, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याशिवाय आजतागायत विश्वासदर्शक ठराव मांडला गेला नाही अशी विधानसभेची प्रथा-परंपरा आहे, बहुमत असताना का निवडणूक घेतली नाही? असे मत देवेंद्र  फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

चाळीस हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती कार सर्वोत्तम आहे

विदर्भात 'ऑपरेशन लोटस' योजनेची चर्चा, विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ६० नगरसेवक नॉट रिचेबल

पुढील ३ दिवस तीव्र उष्णतेची लाट, विदर्भात रेड अलर्ट

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

पुढील लेख
Show comments