Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणूकांच्या वेळी भाजपाने जनतेची फक्त दिशाभुलच केली, दिलेली आश्वासने खोटी - उद्धव ठाकरे

uddhav thakare
Webdunia
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (16:08 IST)
दोन्ही ठाकरे बंधू सरकारव आणि भाजपावर जोरदार टीका करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहेत. राज्यात १८० तालुक्यात दुष्काळसद्रुष्य परस्थिती आहे या भागाचा दौरा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातुरमध्ये आले होते. मराठवाड्यात दुष्काळाची तिव्रता जास्त आहे त्यामुळे राज्यसरकारने तात्काळ दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी ठाकरे यांनी केली. निवडणूकांच्या वेळी भाजपाने जनतेची फक्त दिशाभुलच केली आहे. आजपर्यंत दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत यामुळे आगामी काळात भाजपाला मतरुपी भिक घालू नका असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. 
 
विधानसभाच नाही तर लोकसभेवरही भगवा फडकवला जाणार असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवाय, राज्यात दुष्काळजन्य स्थिती असतानाही राज्याचे मुख्यमंत्री हातात पंचांग घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त शोधत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.दरम्यान आज शहरात बुथप्रमुखांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. भाजपने युतीबाबत अल्टीमेट दिल्यांनतरही त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. आज लातूरमध्ये बुथप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाण्यात तीन मित्रांचे अंत्यसंस्कार झाले, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली शहर बंद राहिलेझाले, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली शहर बंद राहिले

नागपुरात बाईकला अचानक आग लागली, सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, अशा आगीपासून कसे वाचावे?

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली

पहलगाम हल्ला: संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले

भारताची अॅक्शन पाहून पाकिस्तान घाबरला! LOC वर लष्कर आणि २० लढाऊ विमाने तैनात, स्क्वाड्रन सज्ज

पुढील लेख
Show comments