Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकण रेल्वेचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण नाहीच

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (15:58 IST)
कोकण रेल्वेचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे मार्गाचे ज्या ठिकाणी दुहेरीकरण शक्य आहे त्याठिकाणी ते करण्यात आले आहे.  अजूनही काहीठिकाणी कामे सुरू आहेत. या रेल्वेचा मोठा भाग हा डोंगरदऱयातून जात असल्याने बोगदे व पुलांची संख्या मोठी आहे. त्याच्या दुहेरीकरणाबाबत चर्चा सुरु असल्याचे दानवे यांनी सांगितले.
 
रत्नागिरीतील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दानवे पाटील बोलत होते. कोकण रेल्वे मार्गावरील गणपती उत्सवासाठीच्या रेल्वे गाडय़ा फुल्ल झाल्या असल्याचे म्हटले जाते. पण कोकणातील चाकरमान्यांसाठी या मार्गावर जेवढय़ा गाडय़ा लागतील तेवढय़ा रेल्वे गाडय़ा दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
 
कोरोनाचे संकट गेली दोन वर्ष देशात होते. त्या कालावधीत सर्वच सुविधा बंद होत्या. आता सर्व सुरळीत होत आहे. रेल्वेही रुळावर येत आहे. बंद असलेले स्टॉपही पुढील कालावधीत सुरु होणार आहेत. यातच कोळसा संकट उद्भवल्याने कोळशावरील 372 गाडय़ा बंद होत्या. बाहेरुन येणारा कोळसा महाग असल्याने देशांतर्गत कोळसा उत्खनन वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हे संकट दूर होऊन लवकरच रेल्वे वेगाने धावेल असे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगर : १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर पोहोचली

LIVE: १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर

नागपुरात शुक्रवारच्या नमाजासाठी कडेकोट बंदोबस्त

Gold Rate Today : आज सोने किती स्वस्त झाले? दहा ग्रॅमची नवीनतम किंमत जाणून घ्या

जया प्रदा यांना कधीही अटक होऊ शकते? या शहरात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले

पुढील लेख
Show comments