Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘ती’ पाण्याची बाटली आणायला गेली मात्र…

Webdunia
सोमवार, 3 जानेवारी 2022 (15:17 IST)
‘ते’ दोघे पती पत्नी दुचाकीवरून प्रवास करताना तहान लागली म्हणून थांबले व पत्नी पाण्याची बाटली आणण्याची गेली. मात्र दुर्दैवाने ती रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वेगात असलेल्या एका कंटनेरने तिला चिरडले.
 
ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे चौफुली येथे घडली. शकीलाबी नूर शहा (वय ५०, रा. तिडी,ता. वैजापुर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहा पतीपत्नी आपल्या दुचाकीवरून वैजापूरकडून कोपरगावच्या दिशने जात होते. प्रवास करीत असतांना तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी ते थांबले.
 
पाण्याची बाटली आणण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या (एमएच ४६ एएफ ७९०३) क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून फरार झाला होता. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पसार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments