Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई कोकणात अवकाळी पाऊस येणार, विदर्भ मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

Webdunia
रविवार, 12 मे 2024 (16:11 IST)
राज्यातील काही भागात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे मुंबई, कोकणांत हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

येत्या पाच दिवसात उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, पालघर येथे हलक्या सरी बारसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 
 
सध्या आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात कर्नाटक, केरळ राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या मुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली असून मध्ये महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या काही ठिकाणी येत्या पाच दिवसांत गारपीट होण्याची शक्यता आहे. 
 
हवामान खात्यानं पुणे, लातूर, नांदेड, या 4 जिल्ह्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या शिवाय  येत्या पाच दिवसांत विदर्भ,खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात वादळासह गारपिटीची शक्यता आहे.तसेच या भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments