Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील 82 टक्के जनावरांचे लसीकरण-पालकमंत्री विखे-पाटील

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (08:35 IST)
सोलापूर लम्पी आजाराने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण केली होती. इतर राज्यातील परिस्थितीचा विचार करून वेळीच सावध होऊन राज्य शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील 82 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून संपूर्ण लसीकरण करण्यावर भर राहणार असल्याची माहिती महसूल, दुग्धविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितली.
 
पालकमंत्री नियुक्ती झालेले राधाकृष्ण विखे-पाटील हे पहिल्यांदाच सोलापुरात आले होते. सात रस्ता परिसरातील नियोजन भवन येथे त्यांनी विविध विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा नियोजन समितीची देखील बैठक पालकमंत्री विखे-पाटील यांनी घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लम्पी या जनावरांच्या आजाराबाबत माहिती दिली.
 
सुरुवातीच्या काळामध्ये राजस्थानमध्ये लम्पीबाधित जनावरांची संख्या मोठी होती. या राज्यामध्ये जवळपास 60 हजार जनावरे ही लम्पी आजाराने मृत्यू पडली. हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने वेळीच याचे नियोजन केले. महाराष्ट्रामध्ये साधारण दीड हजार जनावरे ही लम्पी आजाराने दगावली आहेत. राज्यातील जनावरांचा मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकसानग्रस्त पशुपालकांना मदत दिली आहे. याबरोबर जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे प्रयत्न राहणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments