rashifal-2026

एका सिगारेटने थांबवली वंदे भारत ट्रेन

Webdunia
बुधवार, 10 जानेवारी 2024 (12:44 IST)
वंदे भारत एक्स्प्रेस ही सुपरफास्ट ट्रेन आहे. ही ट्रेन नेहमीच कोणत्या न कोणत्या चर्चेत असते. आता ही ट्रेन सिगारेटमुळे चर्चेत आली आहे. धूम्रपान करणे जरी धोकादायक असले तरीही  अनेकांना सिगारेटचे व्यसन आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात सिगारेट ओढणारे हे दिसून येतात. आता या सिगारेटमुळे वेगवान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गोंधळ झाला आणि ही वेगवान धावणारी ट्रेन थांबली. 

छत्रपती संभाजी नगरहून मुंबई कडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मध्ये एका प्रवाशाला सिगारेटची तलफ आली आणि त्याने बाथरूम  मध्ये जाऊन चक्क सिगारेट ओढायला सुरुवात केली. डब्यात धूर झाला आणि गाडीच्या डब्यात अचानक अलार्म वाजायला सुरु झाले. आग लागल्याच्या भीतीमुळे बोगीत प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि नंतर गाडी थांबली. मात्र हा धूर सिगारेटचा असल्याचे समजले.  

सदर घटना 9 जानेवारी रोजी नाशिक रेल्वे स्थानकाच्या काहीच अंतरावर घडली आहे. ही ट्रेन नाशिक रेल्वे स्थानकात काहीच अंतरावर होती की अचानक C-5 या कोच मधून अलार्म वाजत होता. काहीच अंतरावर ट्रेन थांबली आणि रेल्वेचे सुरक्षा बाळाचे जवान देखील धावत आले. धूर कुठून आला हे कळले नाही तेव्हा सीसीटीव्ही पाहून एका प्रवाशाने बाथरूम मध्ये सिगारेट ओढल्याचे समजले. या प्रवाशाला नाशिक रेल्वे स्थानकावर उतरवले आणि ट्रेन मध्ये सिगारेट ओढल्याबद्दल ताब्यात घेतले. नंतर ही ट्रेन सोडण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments