Festival Posters

विधानपरिषदेमध्येही भाजपला सर्वात जास्त संख्याबळ

Webdunia
मंगळवार, 10 जुलै 2018 (09:03 IST)
विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता सत्ताधारी भाजप विधानपरिषदेमध्ये सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. भाजपचं विधानपरिषदेतलं संख्याबळ २१ झालं आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ १७ आमदारांपर्यंत घटले आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदारांची संख्या समान झाली आहे. २०१४ सत्तेत आल्यानंतर म्हणजेच साडेतीन वर्षांनी भाजपा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. याआधी  भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी  अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता ११ जागांसाठी केवळ ११ उमेदवारच मैदानात उरले. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यामुळे ११ जागांसाठी उमेदवारांची संख्या १२ झाली होती. त्यामुळे निवडणूक होणार हे स्पष्ट होते. त्यातच पक्षांकडे असलेला मतांचा कोटा पाहता निवडणूक चुरशीची झाली असती. मात्र, देशमुख यांनी अर्ज मागे घेतला आणि ही चुरस टळली.
 
विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल
 
भाजपा- २१
राष्ट्रवादी काँग्रेस -१७
काँग्रेस-१७
शिवसेना- १२
जदयू- १
आरपीआय कवाडे गट-१
शेकाप-१
रासप-१
अपक्ष-१
रिक्त-१

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Maharashtra Municipal Election Results "हा महायुतीचा भव्य विजय असून आम्ही प्रत्येक शहरात बदल घडवून आणू," -फडणवीस

LIVE: अनोखा विजय; एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक जिंकली

अनोखा विजय; एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडचा सूर्यास्त! ४० वर्षांनंतर महापालिका निवडणुकीत बीएमसीचा बालेकिल्ला कोसळला

Bijnor Viral Dog मारुतीच्या मूर्तीभोवती एक कुत्रा चार दिवसांपासून फिरतोय, त्यामागील कारण काय?

पुढील लेख
Show comments