Dharma Sangrah

शालेय पोषण आहार पुरवठ्यातील दराची चौकशी करु – विनोद तावडे

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2017 (09:13 IST)
शालेय पोषण आहारासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याचे बाजारातील दर व प्रत्यक्ष होणाऱ्या पुरवठ्यातील दर यामध्ये तफावत असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. आमदार शरद सोनावणे, सुनिल प्रभू, सरदार तारासिंह, सुनिल केदार, ऍड. राहूल कुल यांनी रायगड जिल्ह्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
 
तावडे म्हणाले की, रायगड जिल्ह्यामध्ये आहार शिजवण्यासाठी बचतगटामार्फत धान्य आणि इतर मालाची खरेदी करण्यासाठी ऑगस्ट 2017 पर्यंत अनुदान जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. इंधन व भाजीपाला यासाठी लागणारे ऑक्‍टोबर 2017 पर्यंतचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच शाळांमध्ये आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनासाठी डिसेंबर 2017 पर्यंत लागणारा निधी वितरीत करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील काही शाळांना तांदूळ पुरवठा उशीरा झाल्याने संबंधित पुरवठादाराकडून दंड आकारण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 पासून निविदा प्रक्रियेतून नियुक्त पुरवठादारामार्फत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा नियमीतपणे करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली

महाराष्ट्रातील पहिली सीबीएसई जिल्हा परिषद शाळा पुण्यात सुरू होणार, ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस उद्घाटन करणार

"आयटी कंपन्यांमधील धर्मांतर रॅकेट खपवून घेतले जाणार नाही," नाशिक प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

नाशिक : एका मोठ्या आयटी कंपनीत धर्मांतर रॅकेट: ९ पीडित समोर; सहा टीम लीडर्सना अटक

माजी भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments