suvichar

गंगापुर धरणांमधून पाणी सोडले।

Webdunia
सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (20:08 IST)
मराठवाड्याला नाशिक, नगरच्या जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मराठवाड्यातून करण्यात आली होती. यासाठी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे सर्व पक्षीय नेत्यांकडून आंदोलनही करण्यात आले होते. मराठवाड्यातील पाण्याचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. या वादावर न्यायालयाने मार्ग काढत जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता शुक्रवारी  रात्री उशिरा नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून जायकवाडीसाठी 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर रविवारी  सकाळपासून अहमदनगर जिल्ह्यातील निळंवडे धरणातून सुद्धा जायकवाडीसाठी 100 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 48 ते 50 तासांमध्ये जायकवाडी धरणात पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीत पाणी सोडताना प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने रात्री उशिरा काढलेल्या आदेशानंतर रात्रीतूनच नगर, नाशिकच्या प्रकल्पांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळा, प्रवरा, दारणा या धरणांमधून पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र रात्री नाशिकमधील दारणा धरणातून विसर्गाला सुरुवात केल्यानंतर रविवारी सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील निळंवडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले.नगर, नाशिक जिल्ह्यातल्या या तीन धरणांमधून 8.603 टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात येणार आहे.
 
मराठवाड्यात दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडला. ज्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. परंतु, याला कोणाचाही विरोध होऊ नये, यासाठी धरण क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्गावेळी नदीपात्रात कुणी उतरू नये, पाळीव जनावरांना जाऊ देऊ नये. विसर्गात अडथळा निर्माण होणार नाही याची नदीकाठच्या रहिवाश्यांनी दक्षता घ्यावी. प्रवाहामुळे काही जीवित वा वित्तहानी झाल्यास त्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग कॅम्पस वर बुलडोझर चालला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी २०२७ च्या जनगणनेत जात जनगणनेचा समावेश करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला

हरिद्वार वनक्षेत्रात पाय कापलेले वाघ आणि वाघिणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली

India-Italy Partnership पंतप्रधान मोदी-मेलोनी यांची भेट आणि भारत-इटली विशेष सामरिक भागीदारी, झालेल्या करारांविषयी जाणून घ्या

पंतप्रधान मोदींकडून मेलोनीना स्पेशल गिफ्ट

पुढील लेख
Show comments