Dharma Sangrah

पुण्यात तीन दिवस पाणी नाहीच फक्त एकच पंप सुरु

Webdunia
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (09:00 IST)
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्यानंतरही पालिकेच्या बंद केलेल्या दोन पैकी केवळ एकच पंप सुरु झाला आहे. पाणी उपसा करणारा एकुण तीन पैकी केवळ दोनपंप सुरु आहेत, अदयापही एक पंप बंद असल्यामुळे पाणी कपात सुरुच राहणारा असून, पाटबंधारे विभागाच्या एककल्ली  कारभार यामुळे  शहराच्या पुर्वभागाचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद आहे. त्यामुळे सणासुदीच्या वेळी पाणीबाणी निर्माण झाली असून समस्त पुणेकर हैराण झाले आहेत. पाणीकपात करावीच लागेल अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.  पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांशी लवकरच बैठक झाल्यानंतर पाणी पुरवठ्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणेकर नागरिकांनी  पाणी काटकसरीने वापरावे असा सल्ला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला तर, पुणे महापालिकेला जेवढा पाण्याचा कोटा दिला आहे, त्याहून अधिक पाणी महपालिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  पुणे शहरासह ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनाही पाणी द्यावे लागते. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे आता नागरिकांना पाणी सर्व कारणे पाहता योग्य पद्धतीने वापरावे लागणर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

भाविकांनी भरलेल्या ट्रॉलीला ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने डॉक्टर असल्याचे भासवून कौन्सलिंगच्या नावावर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली

नीट यूजी परीक्षा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढील लेख
Show comments