Dharma Sangrah

'ती केस आम्ही ही विसरलो अन् ईडीही विसरली...' काय म्हणाले छगन भुजबळ......

Webdunia
मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (20:48 IST)
अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्या विरोधात दाखल याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली ईडीने मुंबई उच्च न्यायालयात कळवले आहे.
 
दरम्यान ईडीकडून दिलासा मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी "ईडीच्या केसमधून सुटलो ही बातमी चुकीची आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी आम्हाला परदेशात जायचं होते. त्यासाठी आम्ही सेशन कोर्टामध्ये अर्ज केला होता. तेव्हा आम्हाला कोर्टाने परवानगी दिली.मात्र त्याला ईडीचा विरोध होता, तेव्हा ईडीने त्या परवानगी विरोधात अपिल केले होते. आता ती केस आम्ही पण विसरलो आणि ईडी पण विसरली..." असे भुजबळ यावेळी म्हणाले.
 
"आम्ही परदेशात जाऊन आलो पण त्यामुळे त्या केसला काही अर्थ राहिला नाही. जी मेन केस आहे ती पण विड्रॉल झाली पाहिजे. आम्ही महाराष्ट्र सदनच्या केसमधून सुटलो आहोत. त्यामुळे ईडीची केस आमच्याकडून काढून घेतली पाहिजे त्यासाठी आम्ही कोर्टात लढत आहे.." असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
 
काय होते प्रकरण?
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना 2016 मध्ये झाली रोजी अटकही झाली होती. तब्बल दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने भुजबळांना जामीन मंजूर केला होता. कोर्टाच्या या निर्णयाला ईडीने 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वीर सावरकर पुरस्कार नाकारला

GDB संशोधन: भारतातील ३०% पेक्षा जास्त महिलांना बालपणातील लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागला

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या

बिबट्याचा धुमाकूळ, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

पुढील लेख
Show comments