Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोहण्यासाठी गेले पण अंदाज चुकला, तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

Webdunia
मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (17:34 IST)
नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद इथं पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे असं या मयत मुलांची नावे आहेत.
 
नेमकं काय घडलं?
गंगापूर धरणातून सध्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने मखमलाबाद परिसरातील पाटाला पाणी आले आहे. याच पाटाच्या पाण्यात पोहोण्यासाठी परिसरातील हे तिन्ही मित्र आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर 5  मित्रांसह गेले होते. या तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघे जण पाण्यात बुडाले. सोबतच्या मित्रांनी तिघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. जीवरक्षक दलाच्या जवानांनीही तत्काळ धाव घेतली तरी मुलांना वाचवण्यात यश आले नाही. या तिन्ही मुलांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या तिघांचे वय अंदाजे १४ ते १५ वर्ष आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. 
 
आपले मित्र पाण्यात बुडूत असल्याचे पाहून दोघांना आरडाओरडा केला. पाण्यातून बाहेर इथं आजूबाजूच्या लोकांना सांगून मदतीसाठी याचना केली. पण, परिस्थितीमुळे घाबरलेल्या या दोन मुलांना या ठिकाणाहून पळ काढला. नंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिघे जण पाण्यात बुडाल्याचे आढळले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. 
 
स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या अर्धा तासात तिघांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र दुर्दैवाने या तिघाही मुलांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासना कडून देण्यात आली.
 
निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे या तिन्ही लहान मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश केला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments