Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?

Webdunia
मंगळवार, 26 मे 2020 (16:41 IST)
कोरोना पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांना पत्र लिहून “विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? कोरोनासारख्या महामारीच्या काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी?” असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे.
 
“मे महिना संपत आला आहे, तरी या परीक्षांचा निर्णय होत नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. सध्याची परिस्थिती पाहता मुंबई आणि पुणे परिसरात अजून किती काळ टाळेबंदीत राहावे लागेल, याचे भाकीत कोणीच करु शकत नाही. बरं, जर टाळेबंदी शिथिल झाली तर याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही, हे आपण देखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?”
 
दरम्यान मुंबई विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी हे अनेक किलोमीटर प्रवास करुन त्यांच्या परीक्षाकेंद्राना पोहोचतात. आजच्या परिस्थितीत अशा हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचणेसुद्धा शक्य होणार नाही. कोरोनामुळे अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले आहे. किमान त्यात परिक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी त्यांच्या डोक्यावर नको, असेही राज ठाकरे यांनी सुचवले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments