Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, मुंबई-पुणे रेल्वेसेवा कधी सुरू होणार

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (17:12 IST)
राज्य सरकारने जिल्ह्यांतर्गत प्रवासावरील बंदी उठवली आहे. तेव्हा सरकारने परवानगी देताच मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. ही सेवा सुरू करण्याबाबतची आमची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
महाराष्ट्रातील प्रमुख शहरे म्हणून मुंबई आणि पुणे ओळखले जाते. नोकरी आणि कामानिमित्त या दोन्ही शहरांदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. लॉकडाऊनपासून रेल्वेची ही सेवा बंद आहे. आता राज्य सरकारने जिल्हा बंदी उठवली असून प्रवाशांना राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नाहीत, असे शर्मा यांनी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments