Festival Posters

वाचा, फडणवीस यांनी पडळकरांना का बोलावून घेतले

Webdunia
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:33 IST)
जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच जेजुरी संस्थान आणि भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यातला वाद समोर आला होता. या प्रकरणात  पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीकाही केली होती. अहिल्यादेवी आणि शरद पवार यांच्या विचारात साम्य नसल्याची टीकाही पडळकरांनी केली होती. पण शरद पवारांवर केलेली टीकेवर भाजपने त्यांची पाठराखण केली आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांच्या विधानावर कोणताही आक्षेप घेण्यासारखे ते वक्तव्य नसल्याचे सांगत त्यांना क्लिन चिट केली आहे. पण राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पडळकरांच्या भाषेविषयी आधीच भूमिका मांडलेली आहे. 
 
शरद पवारांना लक्ष्य करताना गोपिचंद पडळकर यांची भाषा म्हणजे ती धनगर समाजाची भाषा आहे. हा समाज शरद पवारांवर चिडलेला आहे, त्या समाजाची भाषाच तशी आहे अशी पाठराखण चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पण या सर्व प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या प्रसंगानंतर एक वेगळीच भूमिका घेतली होती. शरद पवारांवर गोपिचंद पडळकर यांनी टीका केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी याआधीच्या घटनेत व्यक्त केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सोलापूरात एका दौऱ्यानिमित्ताने आले होते. या दौऱ्यातच फडणवीस यांनी पडळकरांना बोलावून घेतले. त्यावेळी पडळकर यांचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारतीय इतिहासातील सर्वात मोठी दरोडा! १००० कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक गायब झाला

Hapus Mango पुण्यातील फळ बाजारात हापूस आंब्याची एंट्री, पहिली पेटी १५,००० रुपयांना विकली गेली

पद्म पुरस्कार: ५ पैकी ३ पद्मविभूषण केरळवासीयांना... शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला

संजय राऊत यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, "जर मला सत्ता मिळाली तर मी त्याचे १५ तुकडे करेन"

पुढील लेख
Show comments