पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे. आजपासून अधिवेशन सुरु होतं आहे.
अधिवेशनच्या पूर्वसंध्येआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर दिलं.
मंत्रिमंडळ विस्तार, कर्जत बलात्कार प्रकरण, खडसेंना मिळालेली क्लिन चीट, आंबेडकर भवन हे मुद्दे पावसाळी अधिवेशनात गाजणार असल्याची चिन्ह आहेत.
संसदेचंही पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलवण्यात आलेल्या बैठकीला सर्वपक्षीयांनी हजेरी लावली होती. या अधिवेशनात जीएसटीसह महत्त्वाच्या विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असणार आहे.