Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल महाराष्ट्राबाहेरच

Webdunia
नवी दिल्ली- आयपीएलचे 1 मे नंतरचे सामने आता महाराष्ट्राबाहेरच होतील. भीषण दुष्काळामुळे राज्यात होणारे आयपीएलचे सामने इतर ठिकाणी खेळवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
 
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलचे महाराष्ट्रात होणारे 13 सामने इतर राज्यात खेळवण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर बीसीसीआयने विनंती केल्याने 1 मे रोजी पुण्यात होणारा सामना खेळवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. तसेच आयपीएलच्या वेळापत्रकानुसार, सामने खेळवण्यात यावेत, अशी विनंती केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्रात पाणीटंचाई असताना आयपीएलचे सामने नको. भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवणे योग्य आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
 

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

पुढील लेख
Show comments