Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिल्हा परिषदेच्या शाळेतील ८०-९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली

Webdunia
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016 (12:02 IST)
लातूर तालुक्यातील सलगरा बु. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ८०-९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु असून चार विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे वृत्त आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांना आज दुपारी देण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनातून-खिचडीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना खाऊ घालण्यात आलेल्या खिचडीत चक्क पाल सापडली आहे. दुपारी हे भोजन घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली, अनेकांना उलट्या झाल्या. हा सारा प्रकार पाहून या सर्वांना लातूरच्या सरकारी दवाखान्यात आणले गेले. बहुतेकांची प्रकृती ठीक आहे. धास्तावलेल्या पालकांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. अधिक तपास केल्यानंतर खिचडीतली पालही सापडली. ही पाल उत्तमरित्या तळून आणि शिजून निघालेली होती. घटना समजताच लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, दगडू पडीले यांनी सरकारी दवाखान्यास भेट दिली, माहिती जाणून घेतली, सूचना केल्या.

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

पुढील लेख
Show comments