Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नववी, अकरावीच्या परीक्षा बोर्डाकडून नाहीत

Webdunia
सोमवार, 20 जून 2016 (10:52 IST)
नववी आणि अकरावीसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नसून, या परीक्षा आधी सुरु असलेल्या पद्धतीनेच होतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जात असताना, आता नववी आणि अकरावी या दोन वर्षांसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांनुसार परीक्षा घेण्याचा विचार सरकार दरबारी केला जात आहे.

बोर्डाच्या परीक्षेची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा निर्णय घेतला जात असल्याचीही चर्चा सुरु आहे. मात्र, या केवळ चर्चा असतानाही शैक्षणिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. त्यानंतर तावडेंनी स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नववी आणि अकरावीच्या परीक्षा बोर्डाकडून होणार नाहीत, असे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. आता ज्या पद्धतीने नववी, अकरावीच्या परीक्षा होत आहेत, त्याच पद्धतीने यापुढेही होतील, असेही ते म्हणाले.

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

पुढील लेख
Show comments