Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाराज मुंडेंच्या समर्थकांनी जाळला मुख्मंत्रंचा पुतळा

Webdunia
मुंबई- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारानंतर या नव्या मंर्त्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. यात पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंर्त्यांचे पंख छाटण्यात आले आहे. खातेवाटपात पंकजा मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे, त्यांच्याकडून जलसंधारण खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या आहे. त्यांनी आपली नाराजी ’टि्वटर’वर व्यक्त केली आहे.
 
अहमदनगरमधील पाथर्डी येथे पंकजा मुंडे यांच्या संतप्त कार्यकत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला. पंकजा यांचे जलसंधारण मंत्रालय काढल्याने कार्यकर्ते चिडले आहेत. त्यांनी यावेळी मुख्यमंर्त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही केली.
 
पंकजा मुंडेंनी केले ट्वीट, मी जलसंधारण खात्याची मंत्री नाही..’पंकजा मुंडे सध्या सिंगापूरला आहेत. वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहाण्यासाठी पंकजा गेल्या आहे. पण, त्यांचे जलसंधारण खाते काढून घेतल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या आहेत. त्यामुळे आपण मंत्री नसल्याने या समिटला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांने 'ट्वीट' केले आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या 'ट्‍वीट'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिट्‍वीट केले आहे. 'खात्याची मंत्री म्हणून नाही तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या समिटला उपस्थित राहा', असे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री व पंकजा यांच्या 'ट्‍वीट-रिट्‍वीट'मुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments