Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये जनजीवन पूर्वपदावर, मात्र ८ गावांत संचारबंदी

Webdunia
तळेगाव बालिका अत्याचारप्रकरणामुळे तणावात असलेल्या नाशिक शहर परिसराचे जनजीवन  गुरुवारी पूर्वपदावर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये यामध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती आहे. याशिवाय शहरातील परिवहन महामंडळाची बससेवा नियमितपणे सुरु झाली आहे. मात्र त्र्यंबकेश्वर, बागलाण, कसारा आणि नाशिकरोडसाठी चालविली जाणारी बस अजूनही बंद आहे. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील ७ गावांमध्ये बुधवारी रात्रीपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात शेवगेदारणा, वाडीवर्हेे, गोंदे, विल्होळी, सांजेगाव, तळेगाव, अंजनेरी, तळवाडे या गावांचा समावेश आहे. शहरात शांतता  असून संवेदनशील परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस यंत्रणेने पूर्ण शहरात स्ट्राईकिंग फोर्स तैनात केले आहे. शहरात अफवा पसरवून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने मोबाईल इंटरनेट सेवा आणि मद्यविक्री बंद ठेवली आहेत. याशिवाय अफवा पसरवणारयांवर शहर आणि जिल्हा सायबर सेलची करडी नजर असून अफवा पसरवल्याचे आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments