Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठवाड्यात चमत्कार दुष्काळ संपला १६ वर्षांनी पहिल्यांदाच धरण भरले

Webdunia
सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (14:48 IST)
पूर्ण देशात गाजलेले आणि प्रथमच भारतात मिरजहून लातूरला पाणी पोहचवण्याचा प्रयोग सगळ्यांनी पाहिला आहे.अनेक वर्षे दुष्काळ भोगलेल्या मराठवाडा अखेर सुखावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या जाल्युक्त शिवार कामांना चांगलेच यश मिळाले आहे.
 
लातूरसह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील १२ गावांना पाणी पुरवणार्‍या मांजरा धरणात मुबलक पाणीसाठा आला आहे. धरण तुडूंब भरले असून धरणाचे सहा दरवाजे २५ सेंटीमिटरनी उघडण्यात आली आहेत. २०१० नंतर म्हणजेच १६ वर्षांनी  पहिल्यांदाच धरण भरले असून पाणी सोडणे सुरु झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
नदीकाठावरील गावांमधील सर्व नागरिकांनी व शेतकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी, लातूर पाटबंधारे विभाग-०१ लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. 
 
तावरजा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 
तावरजा मध्यम प्रकल्प प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहून येवा (इनफ्लो) असाच राहिला तर येत्या २४ तासात धरण निर्धारीत पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तावरजा नदीमार्गे सोडण्यात येणार आहे. तावरजा नदी काठावरील शेतकरी तसेच नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
आज जलपूजन मांजरा प्रकल्पात उत्तम पाणीसाठा झाल्याने लातूर महानगरपालिकेने धरणावर जलपूजन करण्याचे ठरवले आहे.  महानगरपालिकेचे प्रशासन आणि पदाधिकारी जलपूजन करणार आहेत.

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

चिकनसोबत दारु पिण्यासाठी पैसे मागितले, न मिळाल्यास पत्नीची हत्या

नदी पात्रात बुडून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

RR vs PBKS : राजस्थान विरुद्ध पंजाब सामना कोण जिंकणार? प्लेइंग 11 जाणून घ्या

भारतात आला कोरोनाचा नवीन वेरिएंट, जाणून घ्या लक्षण

पुढील लेख
Show comments