Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रस्ते व जलवाहतुकीसाठी वाहन कंपन्यांनी पुढाकार घ्यावा

Webdunia
शनिवार, 24 जानेवारी 2015 (15:10 IST)
आगामी काळात रस्ते विकासाबरोबरच देशांतर्गत जलवाहतूक विकसित करण्याला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार असून या कामात वाहन क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी जगभरातील वाहन कंपन्यांना केले. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल व कंपन्यांना आर्थिकदृष्टय़ा किफरयतशीर ठरेल, अशी जलवाहतूक विकसित करण्यासाठी सरकारकडून करसवलतीही देण्यात येईल, असे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी केले. यासाठी सरकारने 101 नवीन
जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव तयार केला असून येत्या अधिवेशनात तो संसदेत मांडला जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
 
कोथरूड येथील भारतीय वाहन संशोधन महामंडळ अर्थात एआरएआयच्या परिसरात सुरू असलेल्या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिसंवादाची (सिआट 2015) आज सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते.
 
देशातील रस्ते योग्य पद्धतीने बांधले गेले नसल्याने अनेक रस्त्यांवर अपघाताचे धोके आढळतात तेव्हा रस्तेबांधणी व विकासाच्या कामात भारतीय वाहन कंपन्यांनी पुढे यावे अन्यथा केंद्र सरकारला परदेशी कंपन्यांची मदत घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी वाहन कंपन्यांना दिला. 
 

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

Show comments